तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आघाडीवर असणाऱ्या चीनने आता प्राथमिक शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. बालवयातच चिनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून एआयचे धडे मिळणार आहेत. हे एक क्रांतिकारी पाऊल मानायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय शिक्षणव्यवस्थांनी देखील यामधून बोध घेणे आवश्यक आहे. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणात हिंदीसारख्या अनावश्यक विषयाची सक्ती करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने ठरविले होते. शिक्षणामध्ये बदल घडवित असताना नक्की कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे, या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपल्या राज्यकर्त्यांना सापडत नाही, हे दुर्दैव. निवडून आल्यानंतर स्वतःचा राजकीय अजेंडा शिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यातच आपले राज्यकर्ते मग्न झालेले दिसतात. भारताला तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिक वेगाने प्रगती करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? या प्रश्नाचे उत्तर शिक्षण तज्ञांचा सल्ला घेऊन शोधायला हवे. चीनसारखा देश आपल्या विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच तंत्रज्ञानाचे धडे द्यायला सज्ज झालेला आहे. आणि आपण मात्र अनावश्यक विषयांचा बोजा विद्यार्थ्यांवर लादत आहोत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अजूनही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडविणे गरजेचे वाटते. निदान यासाठी तरी भारतातील नाही किमान बाहेरील शिक्षण तज्ञांची मदत घेतली तरी पुरे.
--- तुषार भ. कुटे
#तंत्रज्ञान #एआय #मराठी #शिक्षण #हिंदी_सक्ती #महाराष्ट्र
Wednesday, April 23, 2025
प्राथमिक शिक्षण - चीन आणि भारत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com